Wednesday, December 28, 2016

शब्दविद्या विजेत्या कविता भाग- २६/१२/२०१६

[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *सर्वोत्कृष्ट*

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

.....(अष्टाक्षरीत ).......

चिवचिवाट पक्ष्यांचीे
थांबले अाता हे झरे
निसर्ग आमचा बाप
हळव्या जखमा भरे ।।
पकडू विचित्र मासे
जी देती नेहमी धोका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेवू अलगद झोका ।।

झाडं म्हणते मजला
चढ जरा हळूवार
खेळ तू माझ्यावरती
फांदीचा देतो आधार ।।
मग कशास सोडू मी
उडी मारण्याचा मौका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेवू अलगद झोका ।।

बोलका आमचा खेळ
दिसले खरे दर्पण
जगण्यात आहे मजा
शिकवते बालपण ।।
विसरा कालचा हेवा
कटू आठवण रोका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेवू अलगद झोका ।।

गुंतली माणसे सारी
अनं स्वार्थी झाल्या जाती
गड्या फक्त समजली
अन्न देणारी ही माती ।।
जगतांना खेळू हासू
धडके ह्रद्याचा ठोका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेऊ अलगद झोका ।।

नाजूक कळ्या ह्या आम्ही
उमलून घेऊ थोडे
आयुष्याचे एेसे क्षण
उजळून घेऊ थोडे ।।
बघून आम्हा हसतोे
चिऊचा रिकामा खोका
ढिंगचांग ढिंग नाचू
घेऊ अलगद झोका ।।
         एजाज बी. शेख
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*प्रथम*

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

*दंगामस्ती*

आकाशाच्या अंगणात,
खुशाल मोकळे फिरू.
झाडे वेली रानपाखरे
दंगा मस्ती करू.॥

नकोच शाळा आणि पुस्तक
दफ्तर पाटी खडू
खुशाल सरसर खारू सारखे
झाडावरती चढू.॥

हवी कशाल मोटरगाडी
तकलादू बाहुला
फांदीवरती खुशाल बांधू
झाडावरती झुरला.॥

कशास कृत्रीम पाऊसपाणी
भिर्रभिर्रणारे झरे.
माशासारखी डुबकी मारू
सखे साजणी गडे.॥

        *प्रा.श्री.धनाजी जनार्दन बुटेरे*
             पोई ; कल्याण ; ठाणे
                     *अध्यक्ष*
         महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे
              (कल्याण ग्रामीण)
         djbutere@blogspot.com

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *द्वितीय*

चित्रकाव्य स्पर्धेसाठी,,,,

🌹  *स्वच्छंदी बालपण*  🌹

रानीवनी अोढ्यावरी,
विहरावे पक्ष्यांपरी,
हुंदडून आनंदाने,
झुलावे त्या फांदीवरी।

       नसे तमा ही दुःखाची,
       ना काळजी भविष्याची,
       भावनांना सल नसे,
       पुढयातल्या संकटांची।

स्वच्छंदी बालपण हे,
निरागस झऱ्यासम,
खळखळ ओसंडते,
धुंद धबधब्यासम।

        फुलारून बालपणी,
        व्हावे परिपक्व असे,
        ताकदीने संकटांस,
        शह देण्या सज्ज जसे।

मस्त फुलावे मस्तीने,
गाणे गावे धुंद व्हावे,
छेडून फुलपाखरां,
अाकाशी झेप घ्यावे।

       *अर्चना वासेकर*
            *यवतमाळ*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *द्वितीय*

*शब्द विद्या समूह...*
चिञकाव्य लेखन स्पर्धेसाठी

-------------------------
       *स्वातंत्र्याचा अर्थ*

स्वातंत्र्याचा कसलाही अर्थ
न कळलेल्या आदिवासी पाड्यात
मुक्त खेळतात रे मुली...
अन् इथल्या स्वातंत्र्यात रोज
अन्याय अत्याचारानं
किती विझून गेल्यात रे चूली...
तिथे निरागस कोवळ्या
मनावर संस्कार निसर्गच गोंदतो...
अन् सिंमेटच्या जंगलात आम्ही
मुले संस्कार वर्गात न्हेऊन कोंडतो...
जंगलातल्या वाघानांही नाहीत
घाबरत तिथल्या रे मुली...
अन् माणसांच्या फौजफाटेत
बळी पडतात लांडग्यांना रे मुली...
घनदाट जंगलात त्या
स्वातंत्र्य उपभोगतात तिथल्या मुली...
अन् बंदिस्त भिंतीत शोधती
हवा स्वातंत्र्याची खुली...
अन् इथल्या स्वातंत्र्यात रोज
अन्याय अत्याचारानं
किती विझून गेल्यात रे चूली...

*✍कवी प्रमोद जगताप*
         *२६/१२/२०१६*
------------------------
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *तृतीय*

चित्रकाव्य स्पर्धेसाठी

      ॥मोकळा श्वास ॥

अलगद ,अवखळ ,उनाड वारा
शुभ्र पांढऱ्या बर्फाच्या गारा
नेहमीच काय एसी चा मारा
अंगावर झेलू शीतल जलधारा ॥

पाण्यांतल्या माशांशी मारूनी  गप्पा
अलगद गाठूनी झाडांवरचा टप्पा
टी व्ही मोबाईलला देवूनी धप्पा
हिरव्या दोस्तांसाठी खोलू मनाचा कप्पा ॥

सरसर सरसर झाडांवर चढू
मस्त लोंबकळत हिंदोळ्या घेऊ
कशास त्या आरशात पाहू
कधीतरी पाण्यातही प्रतिबिंब शोधू ॥

शाळा ते घर अन् दररोज चा अभ्यास
धावपळीत जगण्याचा आपलाच ध्यास
मातीतल्या नात्याला जगण्याची आस
निसर्गाच्या कुशीची धरुनी कास ॥

घेऊ चला थोडा मोकळा श्वास
घेऊ चला थोडा मोकळा श्वास ॥

पल्लवी कोल्हापुरे पाटील -
ता - शिरोळ जि - कोल्हापूर
9921775927
[28/12 12:47 pm] ‪+91 94210 33141‬: *तृतीय*

🎯भव्य चित्र काव्य स्पर्धा🎯
दि.२६/१२/२०१६

🏵।।बालकविता।।🏵

⚽स्पर्धेसाठी⚽

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हिरव्यागार शिवारात
गर्द झाडांची दाटी
ठरलेल्या असतात
इथेच रोज गाठीभेटी

अवखळ निरागस
उनाड ते बालपण
आठवांच्या शिदोरीचे
विसरत नाहीत क्षण

कधी सुरपारंब्या
कधी माकड उड्या
बालपणीच करता येतात
अवखळपणाच्या खोड्या

बालपणी काय कळावी
जगण्याची रितभात
स्वप्न मात्र पाहतो
काय व्हावे आयुष्यात

आनंदी आनंद वाटे
फांदीवर झुलताना
हर्षित ही रानपाखरे
स्वच्छंद बागडताना

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

✍🏼संगीता भांडवले✍🏼
     वाशी ,उस्मानाबाद

Wednesday, December 21, 2016

कविता ।।गणिताचा तास।।

।।कविता।।

गणिताचा तास येताच
पोटात येतो गोळा
बेरीज नको,वजा नको
दुश्मन वाटतो फळा

गुरुजींच्या हाती खडू
गणित फळ्यावर देण्याला
मला मात्र आले रडु
गणित येईना सोडवायला

गुरुजी,बाई जवळ आले
मला समजावण्याला
काड्याकुड्या, मणी मोजले
अंक लागलो मोजायला

फरशीवरील आकृतीवर
गणित सोपे वाटले
पटापट सोडवु लागलो
बाईंनी शाब्बास म्हंटले

गुरुजींनी दिली
सोडवाया गणित कोडी
कितीही विचार केला तरी
सुटतच नाही अढी

बुध्दीला चालना मिळाली
विचार लागलो करायला
गणिताचा तास आता
कोड्यातुनही उलगडला

कृतीयुक्त शिक्षण आंम्हा
उपक्रमातुन मिळु लागले
गणिताची भिती गेली
गणित आवडु लागले.

संगीता भांडवले(मु.अ)
जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी जि उस्मानाबाद
९९२३४४५३०६
myshikshankatta.blogspot.com

Sunday, December 11, 2016

आजची बचत: उद्याचे भविष्य

:                      *आजची बचत :उद्याचे भविष्य*

       बचत म्हणजे भविष्यातील उपयोगासाठी काही भाग बाजुला काढुन ठेवणे.*बचत*हा एवढासा लहान शब्द पण खुप ताकद आहे या शब्दात .बचतीची ताकद आपण प्रत्यक्ष अनुभवायलाच हवी,मग ती बचत पैशाची असो की,वेळेची,पाण्याची असो की विजेची,सध्या तर कागदाची ही बचत करणे आवश्यक झाले आहे.कारण आपण आज केलेली बचत,काटकसर यावरच उद्याचे आपले भविष्य अवलंबुन आहे म्हणुन प्रत्येकाने याचा मर्यादित वापर करणे गरजचेे झाले आहे.
      पैशाची बचत करणे वाटते तितके सोपे नाही यासाठी वचनबध्दच व्हावं लागतं.डोक्यात खर्चाच्या अगोदर बचतीचे प्लॅनिंग तयार असावे लागते.आधी बचत मग खर्च  या सुत्राचा वापर जर आपण दैनंदिन जिवनात पाळला तर बचतीचे आपले स्वप्न लवकर सत्यात उतरते.खरंतर बचत हिच आपल्या आर्थिक नियोजनाची पहिली पायरी असते.आपण बचत का करावी?
कारण-१.बचतीमुळे आपल्या इच्छा आकांक्षा पुर्ण होण्यास मदत होते.२.बचतीमुळे मालमत्ता निर्माण करण्यास मदत होते.
३.बचतीमुळे आर्थिक सुरक्षितता व स्थैर्य निर्माण होते.
४.भविष्यातील उद्भवणा-या समस्या निराकरणासाठी बचतीचाउपयोग होतो.५.मुलांच्या शिक्षणासाठी,उज्वल भविष्यासाठी.६.लग्न समारंभ यासारख्या आनंदी क्षणासाठी.
या सर्व कारणामुळे बचत करणे आवश्यक झाले आहे. दर महिन्याच्या उत्पन्नातील काही भाग म्हणजे किमान १०%तरी बचत म्हणुन राखुन ठेवला पाहिजे.घरातील प्रत्येकाने बचतीची सवय लावुन घ्यायला हवी.बचत आणि वेळोवेळी संपत्तीची निर्मिती हा आपले आयुष्य घडविण्याचा चांगला मार्ग घडु शकतो.स्वत:तं बॅंकेत खाते असावे.त्यात महिन्याला काही ठराविक भाग भविष्यातील उपयोगासाठी नियमितपणे बाजुला काढुन ठेवावा.आपत्कालिन परिस्थितीसाठी आपणास ही बचत कामी येऊ शकते.
         वेळेची बचत ही मानवी जिवनातील अतिशय महत्वाची गोष्ट आहे. वेळ कोणासाठीही थांबत नसते.एकदा निघुन गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नसते.म्हणतात ना *Time is Money* म्हणुन आपण मिळालेल्या वेळेचा पुरेपुर वापर करुन आपली प्रगती करायला हवी.कामे वेळेत पुर्ण झाली नाहीत तर खुप मोठे नुकसान होते.यासाठी आपण दैनंदिन कामाची यादी बनवायला हवी. वेळेचे उत्तम नियोजन केले पाहिजे.यामुळे कामे वेळेत पुर्ण होवुन वेळेची बचत होते व या उरलेल्या वेळेचा आपल्या जीवनाच्या प्रगतीसाठी आपण वापर करु शकतो.दिवसभरातील २४ तासांचे  नियोजन आपण करायला हवे.यात झोप,मनोरंजन,नौकरीव व्यवसाय,मित्रपरिवार-नातेवाइक,दुरदर्शन,गाणी ऐकणे,व्यायाम इ.प्रकारचे नियोजन तंतोतंत केले तर दैनंदिन कामाबरोबरच आपला बराचसा वेळ वाचेल व तो आपण आपल्या आरोग्यासाठी ,आवड व छंद जोपासण्यासाठी,प्रेक्षणिय स्थळे पाहण्यात,आवडते खेळ खेळण्यावर केला तर आपल्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.परंतु काही लोक पैशापेक्षा वेळेला जास्त महत्व देतात.कारण आपण पैसा कधीही कमवु शकतो पण गेलेली वेळ परत कधीच येत नाही.म्हणुन प्रत्येकाने वेळेची बचत करुन जीवनाचा आनंद घ्यावा.
           पाणी हेच जीवन.सर्व सजीव सृष्टीला पाण्याची आवश्यकता आहे. मानवी जिवनात पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी हा अात्यंत महत्वाचा घटक आहे.पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. म्हणुन प्रत्येकाने पाण्याची बचत करायला हवी.पाणी वापराचे योग्य नियोजन केले तर भविष्यातील पाणी प्रश्न मिटेल.पाण्याची बचत करणे हे सर्वांचेच आद्य कर्तव्य झाले आहे.
अशी करता येईल पाण्याची बचत-----
*भाजी धुतलेले पाणी झाडांना द्यावे.
*कपडे धुतलेले पाणी अंगणात शिंपडावे.
*वाहने धुताना पाणी कमी वापरा.
*झाडांजवळ पाणी भरलेली मातीची भांडी ठेवा.
*पाण्याची टाकी धुताना पाण्याऐवजी हवेच्या प्रेशरचा वापर करावा.
*पाणी कधीच शिळे होत नाही,ते फेकुन न देता झाडांना द्या,फरशा,अंघोळ,कपडे धुणे यासाठी वापरा.
*पावसाचे पाणी वाचवा,साठवा.
अशा प्रकारे पाण्याची बचत करणे आवश्यक झाले आहे. तरच भविष्यातील पाणी प्रश्न मिटेल व दुष्काळी परिस्थिती आपणावर पुन्हा येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.
      आजच्या तंत्रज्ञानाच्या  आधुनिक युगात  विजेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. दैनंदिन  सर्व कामे विजेवरच चालतात.लोकसंख्या वाढीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे आपण आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तिच्या मागे किती वीज वापर लागतो याचा अंदाज आपण आजपर्यंत काढु शकलो नाहीत.तसेच वीजनिर्मितीचे स्त्रोत आपण पाहिजे त्या प्रमाणात वापर करु शकलो नाहीत. कारण विजेची स्त्रोत ही काही प्रमाणात मोफत मिळतात.जसे-सुर्यप्रकाश,पाणी, वारा व समुद्रीलाटा .यापैकी सुर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत ऊर्जेत रुपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रीक अडचणी निर्माण होतात.तर वारा व समुद्रीलाटा यांचे रुपांतर करताना भौगोलिक अडचणी निर्माण होतात. पाण्याचा विचार करताना आपण फक्त काही प्रमाणात याचा वापर करत नाही.तर ज्या ऊर्जा आपणाला मोफत मिळतात त्याचा उपयोग विद्युत ऊर्जेत रुपांतर करण्यासाठी आजपर्यंत फक्त ३ते ५%उपयोग करुन घेतला आहे.कृत्रिमरित्या वीजनिर्मितीसाठी आपण कोळसा व रासायनिक स्त्रोतापासुन तयार करतो.परंतु या सर्व घटकांना मर्यादा येतात.म्हणुन आजपासुन विजेची बचत करणे आवश्यक आहे.
यासाठी आपण हे करायला हवे----
*ट्युबलाईट ऐवजी सी.एफ.एल व एल ई.डी.लाईटचा वापर करावा.
*सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा यात-सौरदिवे,सौरकुकर,सौरबंब,इ.चा वापर करावा.
*विजेची उपकरणे फॅन,लाईट वापर झाला की लगेच बंद करावीत.
*नैसर्गिक सुर्यप्रकाशाचा वापर आपल्या दैनंदिन घरगुती व कार्यालयामध्ये करुन घेतल्यास वीज बचत होते.या सर्वामुळे वीजवितरणावरील भार कमी झाल्यामुळे वीज हानी आपण कमी करुन वाचवलेली वीज आपल्या पुढील भविष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल.
       'कागद मोठा कामाचा'याप्रमाणे कागद हे लिहिण्यास वापरले जाणारे ,छपाईस वा वेष्टनासाठी एक पातळ साहित्य/सामग्री आहे. लाकुड,बांबु,चिंध्या,गवत इ.चे ओले सेल्सुलोजच्या लगद्याचे तंतु विशिष्टरित्या दाबुन व मग वाळवुन कागदाची उत्पत्ती होते.कागद तयार करण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागते.म्हणुन कागदाची बचत व पुर्नवापर करणे आवश्यक आहे. स्वच्छतेसाठीच्या अनेक उत्पादनात तसेच औद्योगिक व बांधकाम क्रियांमध्येही कागदाचा वापर होतो.क्वचितच खाद्य कागद म्हणुनही याचा वापर केला जातो.संगणकाच्या युगातही कागदाचे महत्व आजही टिकुन आहे.*पेपरलेस*कार्यालये करण्यासाठी आजपर्यंत फक्त बोलले जातेय पण प्रत्यक्षात कागदाचाच वापर करत आहेत.म्हणुन कागदाची बचत करावी लागणार आहे.
      या सर्व बाबींचा काटकसरीने वापर करावा व बचतीची सवय अंगी बाणावी.तरच ख-या अर्थाने आजच्या  बचतीतुन  उद्याचे आपले उज्जवल  भविष्य साकारण्यास मदत होणार आहे.

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
मोबा.नं.९९२३४४५३०६

        
     

Sunday, November 27, 2016

जागतिक एडस दिनानिमित्त लेख-भरकटलेली युवापिढी


 जागतिक एडस दिनानिमित्त-
        *भरकटलेली युवापिढी*
                                
दरवर्षी १ डिसेंबर हा जागतिक एडस दिन म्हणुन पाळला जातो. जगभर फैैलावलेल्या एडस (Acquired immune Definitely Syndrome)या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी यासाठी जागतिक राष्ट्रसंघाने UNO(United Nations Organization)घोषित केले आहे.१९८१साली एडस या रोगाचा पहिला रुग्ण आढळला.आणि त्या नंतर वेगाने या रोगाचा फैलाव संपुर्ण जगभरात झाला.या रोगाची कारणे,लक्षणे व उपाय सापडलेत पण अजुनही हा रोग संपु्र्णपणे बरा होण्यासाठी एखादी लस शोधण्यास संशोधकास अपयश आले आहे.म्हणुन यावरती खबरदारी हाच उपाय आहे. म्हणुनच जागतिक पातळीवर सर्वात महाभयंकर रोग म्हणुन या रोगाकडे पाहिले जाते.
       समाजामध्ये बदल घडवुन आणण्यासाठी युवाशक्तीच महत्वाचा वाटा उचलु शकते.भारतातील युवाशक्ती ही अन्य शक्तीपेक्षा प्रभावशाली आहे.जगाला विळखा घालु पहात असलेल्या 'एड्स'या आजाराला थोपविण्यासाठी युवाशक्ती हातभार लावु शकते.जगात एडस या रोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. १९९८ अखेर ३३४ लाख व्यक्तिंना एच.आय.व्ही.विषाणुंची बाधा झाल्याचे वैद्यकिय अहवालावरुन दिसुन येते.या रोगाचा प्रसार होण्यामागे याबाबतचे असलेले अज्ञान दुर करणे आवश्यक आहे. युवापिढी नेहमी धोका पत्करण्यामध्ये अग्रेसर असतात.परंतु त्यांचे मन संस्कारक्षम असते.पालकांनी योग्य वयातच त्यांच्यावर संस्काराची बिजे रुजविण्याचे काम करणे गरजेचे आहे. युवकांमध्ये या रोगाबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
          परंतु हीच बाब सध्या चिंतेचा विषय बनत चाललेली आहे.आजचा युववर्ग हा चुकीच्या मार्गाने जात आहे. पालकांकडे असणारा पैसा व ही चैनी मुले यातुन अनेक गंभीर बाबींना सामोरे जावे लागत आहे.त्याचे वेळोवेळी समुपदेशन होणे गरजेचे अाहे पण तसे होताना दिसत नाही.किशोरवयीन वयापासुनच मानवी लैंगिकता व  लैंगिक संबंधातुन पसरणारे आजार आणि एच आय व्ही जंतुसंसर्ग याबाबतची माहीती त्यांच्या या जडणघडणीच्या काळातच होणे अपेक्षित आहे.परंतु पालक व शिक्षक यांनी या तरुणाईला लैंगिकतेबाबत चर्चा व योग्य व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे.
       'जवान हुँ,नादान नहीं'हे तरुण वर्गाने बोलायला शिकले पाहिजे.आजची युवापिढी देशाचे उज्वल भविष्य समजले जाते परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपुर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवापिढीला विविध व्यसनांनी ग्रासले आहे.युवापिढी पार भरकटली आहे.शरीराला अपायकारक असणा-या तंबाखु,सिगारेट आदि व्यसनांच्या विळख्यात युवक गुरफटलेले आहेत.हा व्यसनांचा विळखाच युवापिढीला अत्यंत घातक ठरत आहे.सध्या या तरुणाईवर सिनेमा,मिडीया,सोशल नेटवर्किंग साईट यांचाच प्रचंड प्रभाव आहे पण त्याचबरोबर देशामध्ये चाललेले पाश्च्यात्याचे अंधानुकरण आणि आपल्या संस्कृतीला प्रतिगामी ठरवुन खोट्या जीवन पद्धतीचा
'पुरोगामी' म्हणुन समावेश केला जात आहे. सिनेमा,मिडिआ,तसेच राजकारणी वर्ग यांचा पण या युवापिढीला भरकटण्यास हातभार आहे असे म्हणले तर वावगे होणार नाही.
     एडस या आजारावर अजुनही म्हणावे तसी लस उपलब्ध नाही,परंतु सुरक्षिततेच्या सवयी व आरोग्यामय जीवनशैलीचा अंगीकार करुन तो सहज टाळता येतो.तरुण अवस्थेत मुले जास्त जंतुसंसर्गप्रणव असतात.मानवी लैंगिकतेबाबत त्यांना अधिक कुतुहल असते.वाईच संगतीमुळे मुले या मार्गाकडे जावु शकतात.हे रोखण्यासाठी जनजागृती व प्रतिबंध केला पाहिजे.

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद
मोबाईल नं९९२३४४५३०६

Sunday, November 13, 2016

पाल्यांचे करिअर,स्वप्न की स्वप्नांचे ओझे

    *पाल्याचे करियर , स्वप्न की स्वप्नांचे ओझे*
  

       आजचे पालकत्व ही अतिशय नाजुक आणि संवेदनशील बाब आहे.मुलांचे संगोपन आणि शिक्षण हा सर्व पालकांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.'स्वप्न'म्हणजे सुचक गोष्टींचा गुंतावळा आहे.प्रत्येक व्यक्तीनुसार सुचक गोष्टींचा अर्थ वेगळा असतो.हाच गुंतावळा ,अपेक्षा चे ओझे मग पाल्यावर लादले जाते.पालकांना अपेक्षा असते आपल्या मुलांनी खुप मोठे व्हावं.नांव कमवावं.सध्या प्रत्येक घरात दोनच मुले आहेत.शिक्षणाचा वाढता खर्चही पालक करु शकतात.अगदी कितीही भरमसाठ फीस असली तरीही.आपले स्वप्न पुर्ण करण्याच्या नादात नकळतपणे स्वप्नांचे ओझे पाल्यावर लादले जाते.काही मुले हा पालकांच्या स्वप्नांचा भवसागर पार करतातही पण काहींच्या पदरी मात्र निराशा येते आणि यातुन अनेक प्रसंगांना ,समस्यांना या पालकांना सामोरे जावे लागते.जिकडे पहावं ति्कडे  स्पर्धा सुरु आहे.सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे .अगदी याची सुरुवात बालवयापासुनच म्हणजे तीन वर्षापासुन मुलांना जीवघेण्या स्पर्धेला सामोरे जावे लागतेय हे वास्तव आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे.अगदी ग्रामीण भागात ही ३ वर्षापासुनची मुले या प्रवाहात आहेत.त्यांच्या बालपणावर हा अन्यायच आहे. तिथुनच पालकांच्या अपेक्षांचे ओझे मुलांच्या खांद्यावर देऊन पालक त्याच्या भविष्याची स्वप्ने रंगवण्यास सुरुवात होते.खाजगी क्लास,विविध शिबिरे  दिवसभर ही मुले बाहेरच असतात.त्यांच्या वेळापत्रकात ना खेळाला जागाe,ना कुणाशी संवादास जागा.जेवढा रिकामा वेळ मिळतो तो टि व्ही,संगणक,मोबाईललाच मिळतो.
     आईवडिलांना मुलांच्या शिक्षणावरुन खुप ताण येतो.ह्याचे कारण म्हणजे शिक्षणाबद्दलची आस्था.दुर्दैवाने शिक्षणापेक्षा सध्या स्टेस्ट्सलाच महत्व दिले जात असल्यामुळेच.व .पु .च्या भाषेत सांगायचे म्हणले तर "लोक काय म्हणतील" यालाच बरेचजण घाबरतात.वास्तविक ९०च्या दशकातील सुरुवातीच्या काळापर्यंत अशी काहीशी अवस्था होती की जर डॉक्टर अथवा इंजिनिअर नसलो तर  पोटापाण्याचे काय होणार.पण आता तसे खरेच आहे का???मुलांना नक्की काय आवडते.त्याचा कोणत्या विषयाकडे कल आहे याचा सर्वच पालकांनी विचार करायला हवा.पाल्यांना स्वत:चे विचार स्वतंत्र चांगले करु शकतील एवढे संस्कार द्या.कुठल्यातरी पुढा-याच्या बोडक्यावर डोनेशन फीस घालुन वरुन अजुन काही लाख रु.केवळ डिग्रीसाठी घालवण्याची गरज नाही.जर सुदैवाने एवढं सारं करण्याची आर्थिक परिस्थिति असली तर त्या परिस्थिती चा चांगला फायदा घेवुन मुलांना जे आवडते ते शिकु द्या.वेळ प्रसंगी रिस्क घेण्यास शिकवावे.त्यातुनच तो जीवनात यशस्वी व तरबेज होईल.शैक्षणिक यश हे आयुष्यातील यशास फक्त १०%कारणीभुत ठरते.समाजात अशी कितीतरी उदाहरणे सापडतील की ज्यांचे शिक्षण वेगळ्या विषयाच झाले अन् व्यवसाय दुस-याच विभागात करतात. अगदी डॉक्टर झालेली मंडळी अभिनय क्षेत्रातही दिसतील. उदा.डॉ.निलेश साबळे.डॉ.अमोल कोल्हे.
          परंतु काही वेळा पालकांनी जरी पाल्यास समजुन घेतले.अपयशानंतर खचुन न जाता धिर दिला तरी आपल्या आजुबाजुचा समाज त्यास स्वस्थ बसु देत नाही.उदा.शिक्षक किंवा डॉक्टर दांम्पत्य असेल तर.....
*  तुम्ही दोघे नोकरदार ,किंवा शिक्षक असुन मुलाला ऐवढे कमी मार्कस् कसे आले??
*  आता तुमच्या मुलाचे कसे होणार??
*  त्याला आता ही साइड झेपेना,तुम्ही उगीच त्याला तिकडे टाकले,या...साइडला टाकले असते तर बरे झाले असते??
*  तुंम्हाला काय पैशाचा प्रॉब्लेम नाही म्हणा,अमुक अमुक ठिकाणी डोनेशन भरुन अॅडमिशन घ्या!!
*  तुम्ही त्याला रिपीट करु द्या ऐवढे वर्ष!
         असे आणि याहुनही भयानक फुकटचे सल्ले आजुबाजुची ही मंडळी देत असतात.पण अशा सल्ल्यामुळे तो विद्यार्थी किंवा त्याच्या पालकावर काय ताण येईल ?ही मंडळी जरासुद्धा विचार करत नाहीत आणि अशातच ही पालकमंडळी आपल्या स्वप्नांचे ओझे मुलांवर लादत असतात.पालकांना हवे असलेल्याच शिक्षणास पाल्यांना प्रवेश देतात .काहीजण तर चक्क म्हणतात मला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे होते,त्यावेळची आमची घरची परिस्थिती किंवा तत्सम कारण सांगतात व ते स्वप्न आम्ही तुझ्यात पाहतोय म्हणुन तु हेच हो... असं म्हणतात.त्या मुलाचा कल,आवड पाहिली जात नाही.तो अभ्यासक्रम मग त्यास पेलवत नाही ,ताण येतो आणि त्यातुनच नैराश्य येवुन अनेक दुर्दैवी घटना घडतात.त्या आत्महत्या असो की व्यसन!त्यास पालकांच्या अपेक्षेचे ओझेच जबाबदार आसते.
      आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हे सध्या पालकाच्या प्रतिष्ठेचा विषय बनत आहे.काही ठिकाणी मुलांना परिक्षेत कमी गुण आले तर घरात अगदी सुतकी वातावरण दिसते किंवा त्या मुलाने काही एखादा गंभीर गुन्हा केल्यासारखे त्याला स्वत:च्याच घरात वागणुक मिळते.हा स्वप्नांचा बाजार मुलांना कुठे घेऊन जाणार आहे? पालकांनी मुलांबरोबर मित्रत्वाचे नाते ठेवावे.वेळोवेळी मार्गदर्शक बनावे.हीच एक माफक अपेक्षा.

संगीता भांडवले
वाशी, उस्मानाबाद

Sunday, November 6, 2016

सेल्फी विथ गुरुजी

शासन निर्णय आणि बदलती शिक्षण पद्धती
-------------------------------------------_---------

*सेल्फी विथ गुरुजी*
================

'सेल्फी विथ गुरुजी'हा शासन निर्णय. या निर्णयानुसार शिक्षकांना दर सोमवारी मुलांसोबत १०-१० विद्यार्थ्यांचा गट करुन सेल्फी काढुन तो 'सरल'प्रणालीवर अपलोड करावयाचा आहे.त्यामुळे येत्या जानेवारीपासुन शाळेच्या आठवड्याचा पहिला तास म्हणजे दर सोमवारी पहिला तास हा सेल्फी तासच ठरणार आहे.या निमित्ताने एक गाणे आठवले.चल बेटा सेल्फी लेले रे.......पण सोमवारी शाळेत गुरुजी जाताच शाळेतली मुलं 'चल गुरुजी सेल्फी लेले रे.'........असं म्हंटली तर अजिबात नाराज होऊ नका.कारण आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच तसा शासन निर्णय ३नोव्हेंबर २०१६ ला काढलाय अन् ऐनदिवाळीतच स्मार्ट फोनच्या जमान्यात 'स्मार्ट दिवाळी सेल्फी धक्का'दिलाय.
       विद्यार्थ्यांची गळती व गैरहजेरी कमी करण्याचे कारण दाखवुन हा शासन निर्णय काढला आहे.उद्देश चांगला आहे पण त्यासाठी 'सेल्फी विथ गुरुजी'च का?गळती व गैरहजेरीचा अन् सेल्फीचा काय संबंध येत नाही तर या प्रक्रियेमुळे शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा विनाकारण वेळ जाणार असुन सरलमध्ये ही माहीती अपलोड करण्यासाठी मुख्याध्यापकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
      सध्या वेळोवेळी बदलत्या विविध शासन निर्णयानुसार --सरलच्या नावावर संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची संपुर्ण माहीती अपलोड करणे,विद्यार्थ्यांचा दाखला ऑनलाईन देवाणघेवाण करणे,शिक्षकांची माहीती, शाळेतील सर्व सोयीसुविधांची माहीती, मध्यान्ह भोजन योजनेतील लाभार्थ्यांची माहीती, विविध शिष्यवृत्यांची माहीती, इन्स्पायर ऍवॉर्ड,स्वच्छ भारत विद्यालय योजनेची माहीती ऑनलाईन करण्याची कामे शिक्षकांना आहेत त्यातच ही सेल्फीची भर.यात वेळ व पैसा या दोहोंचा अपव्यय आहे.
       वेगवेगळ्या प्रकारची माहीती दररोज प्रशासनाकडुन ऑनलाईन व त्याची लिखित प्रत मागीतली जाते.त्यामुळे शाळेतील दोन शिक्षक या कामी व्यस्त असतात.तर दोन शिक्षकी शाळेवर एक शिक्षक शाळेवर व दुसरा माहीती गोळा करण्यात अशीच अवस्था असते.राज्यातील बहुतांशी शाळा या द्विशिक्षकी शाळा आहेत.या सर्वांचा परिणाम अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे खुपमोेठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या सेल्फी मुळे शिक्षकांच्या हाती आता सेल्फी स्टिक येणार आहे.'छडी लागे छमछम विद्या येई घमघम'ऐवजी आता 'सेल्फी स्टिक येई हाती-गुरुजी मुलांच्या फोटोची हौस भागवती'किंवा 'गुरुजी सेल्फी स्टिक हाती लागले धरु-म्हणतील मुले त्यांना अहो!सेल्फी गुरु'असे म्हंटले तर वावगे होणार नाही.
         सध्याचे युग हे माहीती तंत्रज्ञानाचे युग आहे.सर्वजण स्मार्ट फोनचा वापर करतात.डिजीटल शाळा,क्लासरुम,लोकसहभागातुन बनवल्या आहेतच.अनेक शिक्षकांनी स्वत:चे ब्लॉग,अॅप, बनवले आहेत. परंतु ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर,तांड्यावर काम करणारा शिक्षक ही कामे करु शकत नाही.त्यास तंत्रज्ञानाची ओळख नाही असे नव्हे तर या सर्व कामासाठी त्याला खुप धावपळ करावी लागते.ब-याच ठिकाणी नेटवर्क नाही,नेटकॅफेवर ही माहीती भरायची म्हणले तर ऱोज जवळजवळ ५०₹ खर्च येतो.यासाठी कसलाही निधि उपलब्ध नाही.अशा परिस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे का हिच कामे करायची. याचा विचार तरी कोण करेल?शिक्षकांना शिकवु द्या.ऑनलाईन कामासाठी इंटरनेट व कॉम्प्युटर जोपर्यंत शासन पुरवत नाही तोपर्यंत तरी हे शक्य नाही असे वाटते.आधीच 'सरल'ची माहीती भरुन गुरुजी पार 'वाकडा'झालाय.त्यातच हातात ही सेल्फी स्टिक.
           सध्या 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' करण्याचा ध्यास गुरुजींनी घेतला आहे.येत्या डिसेंबर आखेर 'प्रगत शै महाराष्ट्र' करण्याचे स्वप्न गुरुजी पाहत आसतानाच हा शासन निर्णय.शिक्षक व विद्यार्थ्यांत दुरावा येऊ नये असे निर्णय घ्यावेत.त्याचे स्वागतच होईल.कारण सध्या'शिक्षक ऑनलाईन व शाळा ऑफलाईन'अशीच स्थिती या विविध ऑनलाईन कामामुळे झाली आहे.अशा  वेळोवेळी बदलत्या शासन निर्णयामुळे काय साध्य होणार आहे.शहरी विभाग व ग्रामीण विभाग या दोन्हींचा विचार करुन शासन निर्णय काढायला हवेत.सेल्फी असो की पाठीवरील दफ्तराचे ओझे .शहरी भागात यास काहीच अडचण येत नसावी.ग्रामीण भागात वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते.जिथे १२-१२तास विजेचे सततचे भारनियमन असते,शाळेचे विज कनेक्शन बिलाअभावी खंडीत केले आहे,जिथे साध्या फोनलाही रेंज येत नाही तिथे ऑनलाईन कामाची अपेक्षा?किती विरोधा भास हा.तरीही खाजगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांची प्रगती निश्चितच चांगली झालेली आहे. सध्या ज्ञानरचनावाद पद्धतीत विविध कौशल्ये वापरुन गुरुजी प्रगती करत असतानाच अशा निर्णयाने त्याची भंबेरी उडाली आहे.त्या गुरुजीला ताणतणावमुक्त जगु द्या!त्याला समजुन घेण्याची गरज आहे. त्याच्या मानसिकतेचाही विचार करणे गरजेचे आहे.नसता गुरुजी काही दिवसातच 'निरोगी ऐवजी मनोरोगी'होण्यास वेळ लागणार नाही.कुठेतरी विचार करण्याची गरज आहे.

संगीता भांडवले
प्रा शा शेंडी
ता वाशी जिउस्मानाबाद
Email-iamsangitabhandwale@gmail.com
Blog-myshikshankatta.blogspot.com

Sunday, October 23, 2016

कविता अंधश्रद्धा

    ।।अंधश्रद्धा।।

घ्या विज्ञानाचा वसा
अंधश्रद्धेला नको थारा
गंडेदोरे जंतरमंतर
यांना छु मंतर करा

     नसती जगी भुतेखेते
     असतो  वहंम मनाचा
     करा पर्दा फाश
      भोंदु बुवा बाबांचा

येते जयांच्या अंगी
तो ढोंगी ओळखावा
जो होईल त्याचा दास
तो अज्ञानी मानावा

     दगडास पुजुन कुठे
     लाभती मुले, धनसंपत्ती
     विज्ञानानाची कास धरा 
     होईंल तुमची प्रगती

गर्भलिंग निदान
हा आहे गुन्हा
अंधश्रद्धेच्या नावावर
का करतात पुन:पुन्हा

विज्ञानाची धरा कास
विज्ञान रुजवा कणाकणात
विज्ञानाने करा प्रगती
जीवन बदलेल एका क्षणात

     विज्ञानाचा घेता वसा
     होतील बदल आमुलाग्र
     वाढेल प्रगतीचा आलेख
     होईल बुद्धी कुशाग्र

नको अंधश्रद्धेचा होऊ बळी
नको अंधश्रद्धेला देऊ थारा
याचसाठी दाभोळकरांनी
बलिदान दिला जीव प्यारा

     संगीता भांडवले
मु अ जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी,जि उस्मानाबाद
९९२३४४५३०६
     

   

    

     

         

कविता भुकबळी

कविता
     ।।भुकबळी।।

भाकरीच्या चंद्रासाठी
दारोदार फिरतो आहे
भुकेने व्याकुळ मन
घासासाठी झुरते आहे

वर उन्हाचा चटका
पोटात भुकेचा डोंब
स्वत:च्या सुखासाठी
करती कुणी शांती,होम

धनिकाला कमी नाही धनाची
पुढ्यात धान्याच्या राशीच राशी
गरिब मात्र एकवेळच्या जेवणासाठी
दिवसभर दारोदार फिरतो उपाशी

मंदिराच्या दारात बसणा-याला
कुणी छदाम ही भीख देत नाही
सुवर्ण कळसासाठी मात्र
देणगीदारांची रिग आहे

भरल्या मंदिराच्या हुंड्या
झाले हिरेजडीत कळस
गरीबांना मात्र,आजही
पोटभर अन्न नाही दोन वेळेस

शेतीप्रधान देशाची
ही शोकांतिका आहे
रोज कितीतरी जणांचा
भुकबळी जात आहे

संगीता भांडवले
मु अ जि प प्रा शाळा शेंडी
ता वाशी,जि उस्मानाबाद
९९२३४४५३०६


शेतकरी जगला तर;देश टिकेल(वैचारिक लेख)

शेतकरी जगला तर ; देश टिकेल! भारत हा शेतीप्रधान देश आहे.शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे.भारतातील जवळ जवळ ७०%लोकांची उपजिविका शेतीवर अवलंबुन आहे.शेतकरी हा भारताचा अविभाज्य घटक आहे.परंतु या शेतीप्रधान देशातील शेतकरी,जो जगाचा पोशिंदा आहे.तोच नेहमी निसर्गाच्या चक्रात सापडतो.कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ ,कधी महापुर,कधी वादळ,तर कधी गारपीठ.या सा-या संकटांचा त्याला वेळोवेळी सामना करावा लागतो.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे जेंव्हा हिसकावुन घेतला जातो.तेंव्हा तो शेतकरी अपयशाने खतुन जातो.त्याचं अंध:कारमय भविष्य त्याला दिसतं अन् नकळतपणे आपला संसार उध्वस्त करुन ,आपले कुटुंब वा-यावर सोडुन मृत्युला कवटाळतो.तेंव्हा खुप वाईट वाटते.आपण ज्या कृषिप्रधान देशात राहतो तेथेच या कृषकाची अशी अवस्था पाहताना! सत्तेवर सरकार येते, सत्ता स्थापन करते.शेतक-यांसाठी कोटींच्या कोटी घोषणा ही होतात आणि दुस-या बाजुला मात्र याच शेतक-याचा आपला माल रस्त्यावर फेकावा लागतो ही वस्तुस्थिती आहे.कधी कांदा रडवतो तर कधी झेंडुचा चिखल होतो .कापुस ,मका व सोयाबीनला हमीभाव मिळत नाही.मागील तीन चार वर्षे तर सतत चा दुष्काळ,यात सततच्या भारनियमाने तर उपलब्ध पाणी देखील शेतीला देता आले नाही.अशा सर्व समस्येचा सामना बळीराजाला करावा लागतो आणि यातुनही शेवटी जो माल पदरात पडतो त्याचा मोबदला शेतक-यापेक्षा व्यापा-यालाच जास्त फायदेशीर असतो.मेहनत एकाची अन् लाभ दुस-यालाच अशी गत झालीय. शेतक-याला पेऱणीपासुन ते पिक बाजारात नेईपर्यंत अनेक संकटांना सामोरे जावे लागते.कधी बोगस बियाणे तर कधी खरेदीला रांगाच रांगा.एक धान्य पिशवी बियाणे खरेदीला कधीे कधी एक दिवस जातो नेमके याच दिवसात शेतीची इतर कामे देखील महत्वाची असतात. तिच गत नुकसान भरपाई अनुदानाची.पिकांचे पंचनामे कोण करतात अऩ् कसे होतात हे माहितय आपणाला.पिकविमा भरताना खरा राबता शेतकरी शेतात असतो,गांवकारभारी शेतकरी मात्र पिकविमा भरतात,शासनाचे अनुदानही पदरात पाडुन घेतात.यातुन खरा शेतकरी मात्र या अनुदानास वंचित होतो काऱण काय तर बँकेत असणा-या रांगाच्या रांगा.म्हणुन सरकारने सरसकट सर्वांनाच अनुदानास पात्र समजावे. सततच्या नापिकीला कंटाळुन,सावकारी कर्जाला कंटाळुन महाराष्ट्रातील शेकडो शेतकरी मृत्युचा पाश आपल्या गळ्याभोवती आवळुन आपली स्वत:ची सुटका करुन घेतात.पण घरातील कर्ता पुरुष गेल्याने खुप हाल होतात त्या कुटुंबाचे.त्या घरातील मुले उच्च शिक्षणापासुन वंचित राहतात. सध्या वाढलेली शैक्षणिक फिस त्या कुटुंबाला परवडत नाही.मुलांना शिक्षण ,उत्तम आरोग्य,मुलीचे लग्न,या समस्यांचा सामना त्या कुटुंबियांना करावा लागतो.हे सर्व रोकायचे असेल तर गरज आहे ती सरकारच्या ठोस धोरणांची व अंमलबजावणीची.अशा कुटुंबातील मुलांचे शिक्षण सरकारने मोफत केले पाहिजे.व अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणुन योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. यंदा वेळोवेळी पावसाने साथ दिली.सुरुवातीला थोडाथोडा का होईना पण शेतीला आवश्यक असा पाऊस झाला.पिके जोमाने आली.मध्यंतरी जरा पानसाने ओढ दिली परंतु परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावुन नेला.सगळीकडे पाणीचपाणी झाले.शेते, विहीरी,नदी,नाले,ओढे,बंधारे,तलाव,धरणे सर्व तुडुंब भरली.संततधार पावसाने व जास्त पाण्याने पिके नासली.उडीद,मुग,सोयाबीन ही पिके हातची गेली तर तुरींची पाऩे पिवळी पडली अन् पुन्हा माझ्या बळिराजावर निसर्गाने अवकृपा केली.मागील तार वर्षापेक्षा यंदा तरी दसर, दिवाळीचा सण आनंदाने साजरा करण्याची स्वप्न पाहतानाच निसर्ग असा कोपला.पंधरा दिवसातच होत्याचे नव्हते करुन सोडले.पुढील भविष्यासाठी हा पाऊस चांगला झाला पण सध्याच्या वर्तमानाचे काय?परंतु पुन्हा बळिराजा रब्बीच्या तयारीला जोमाने लागलाय,दाद द्यावी त्याच्या हिमतीला. गतवर्षी झेंडुला ५०-६०रुपये भाव मिळाल्यामुळे अनेक शेतक-यांनी आपल्या शेतात झेंडुची लागवड केली.परंतु या वर्षी दस-याला सुरुवातीला १०-१५ रुपयांनी विकणारा झेंडु ३-५रुपयावर येऊन ठेपला.शेतक-याला त्याच्या लागवडीचा,मशागतीचा खर्च करी परवडला का?अनेक शेतक-यांनी तर ट्रकच्या ट्रक झेंडुची फुले रस्त्यावर फेकणेच पसंद केले.या शेतीच्या कामात कुटुंबातील महिला, शालेय विद्यार्थी शेतात राबत असतात.त्यांना तरी मदत म्हणुन आपण एवढेच करुयात.......... व्यापा-यांकडुन भाजीपाला खरेदी न करता शेतक-यांकडुनच खरेदी करुयात. भाजीपाला खरेदी करताना भावात घासघीस करु नका.त्या शेतक-याचीही मुले शिकुन आपल्यासारखीच नौकरदार बनण्यासाठी मदत करुयात.आपल्या आजी-आजोबांनी,आई-वडिलांनी आपणाला शेतात कष्ट करुनच दोन पैसे मिळविल्यामुळेच आपण शिकलो याची जाणीव ठेवा!शेतक-यांला जगवायचे असेल तर आपण एवढे करायलाच पाहिजे.तरच आपण या शेतीप्रधान देशातील शेतक-याची भावी पिढी म्हणुन गर्वाने मिरवु! संगीता भांडवले मुख्याध्यापिका जि प प्रा शाळा शेंडी ता वाशी,जि उस्मानाबाद 9923445306 Email-iamsangitabhandwale@gmail.com Blog-myshikshankatta.blogs.com